कवितेचे पांखरू जरा वळेना ॥
कित्येक दिवसांची गं तडफड
थांबली काय वाटते फडफड ॥
भुर्रकन उडाले कळलें नाही
घरट्यात येणे सांगीतले नाही ॥
घरटे गं रिकामे पांखराविना
उदासिनता मनी, कळी खुलेना ॥
किलबिल पांखराची की थांबली
निळ्याशार देहाची सृष्टी संपली ॥
किती डौलाने ऐटीत बसायचे
कवितेचे पांखरू ने रूसायचे ?
सुरेश पेठे
०४ ऑक्टोबर २००८
No comments:
Post a Comment