Wednesday, October 8, 2008

" स्माईली " अस्मादिकांना छळी !!

हल्ली आंतरजाल मध्ये स्माईली चे खूप प्रस्थ आहे ! कित्येकदा आधीच मूक भाषणांमधून त्याची मुक्त पणे पेरणी चाललेली असते. कदाचित काहींना ती आंतर्देशीय भाषा चांगली अवगत असावीही. पण आमच्या सारख्यां काहींची कुचंबणा, छळ होतो अशी माझी भावना झाली होती. बरेच दिवस विचार चालू असता निशानाथ माझ्या स्वप्नी आला अणि दृष्टांत च दिला .......



दृष्टांत की मज झाला, निशानाथ स्वप्नी आला । मनीच्या भावना ह्याच्या, गळी चांदण्याच्या माळा

मी आलो आलो म्हणत, अवनी अवतरला । दुडु दुडु जणू, लोकरी गुंडा घरंगळळा......! ...... ॥ १ ॥



समजावून घ्याहो, म्हणती 'स्माईली' मजला । गोल गोळा पिवळा, वेगळा, गुलाम आगळा !

टिंब रेषांची ओळख, फक्त पारख चेहरी । दिसतो नुसता चेहरा, न कळे तो .. तो कि .. ती ? .... ॥ २ ॥



अक्षर बनती शब्द, शब्दांना मिळती अर्थ । भाषेचे नाही बंधन जगतो मुक्त, विरक्त !

गालातच गाली हंसतो, कधी विरमतो ही । मिचकावून डोळे, गुपित तुमचे सांगतो !! .... ॥ ३ ॥



खदा खदा हंसतो, कधी विचकुनि बघतो । त्रासून चिडतो, तर कधी चिडून त्रासतो

चावतो जीभ, चाटी जीभल्या, दाखवी वाकुल्या ? । गंमती जमती सार्‍या माझ्या तच ना दिसल्या ? .... ॥ ४ ॥



गॉगल ह्याचे डोळी डाकूची भुषवी भूमिका । काढताच चष्मा डोळी, गोंधळ करी सर्वांचा

तुमच्या मनीचे भावभांडार रिते करतो. । तुमचीच ना सारी भावभावना दाखवितो .... ॥ ५ ॥



शब्दांच्या पलिकडे , राज्य जगावरी करीतो । अमावस्येला ही कधि, तोंड काळे ना करीतो

माझी ही आहे भाषा, करा आत्मसात थोडीशी । द्या संधी मजला, छळणूक ना समजा त्यांशी ...॥ ६॥



सुरेश पेठे
०७ ऑक्टोबर २००८

बळजबरी

त्या प्रशान्त वेळी नदीच्या किनारी ,

निर्मनुष्य जागी बसलो जवळी

हलकी शी एक सर पावसाची

निकट येण्यास ती होती पुरेशी .... ॥ १ ॥



होते धुंद सगळे तूं ही बेधुंद

डोळ्यात तुझिया वाचला आनंद

मी त्यांत तितकीच रमून गेले

समीप तुझ्या हळूंच सरकले .... ॥ २ ॥



विश्वासले होते तेव्हा तुजवरी

ठसले होते चित्ती रूप निर्मोही

बेभान क्षणी तूं मजला चुंबिले

करकचून मिठीत सामावले ! .... ॥ ३ ॥



अवचित होती ही तुझी धिटाई

धिक्कारून तुज मी तेथून जाई

चिडले, उठले, रागाने बोलले

तिरस्कार मनात ठेवून गेले .... ॥ ४ ॥



अजुनि आठवे ती बळजबरी

अजून ही होते कावरीबावरी

ठेवून सुप्त हेतू तरी अंतरी

मज हवी तुझी ती बळजबरी .... ॥५ ॥



सुरेश पेठे
०६ ऑक्टोबर २००८

कवितेचे पांखरू

मज काय झाले मजला कळेना

कवितेचे पांखरू जरा वळेना ॥



कित्येक दिवसांची गं तडफड

थांबली काय वाटते फडफड ॥



भुर्रकन उडाले कळलें नाही

घरट्यात येणे सांगीतले नाही ॥



घरटे गं रिकामे पांखराविना

उदासिनता मनी, कळी खुलेना ॥



किलबिल पांखराची की थांबली

निळ्याशार देहाची सृष्टी संपली ॥



किती डौलाने ऐटीत बसायचे

कवितेचे पांखरू ने रूसायचे ?

सुरेश पेठे
०४ ऑक्टोबर २००८

शीर्षक गीत

राहूल अनिल आहेत चि 'दादा' , 'शीर्षक गीता' ने पुरा केला वादा ॥

हर्ष होई मज शीर्षक गीताने । गावां शिरोभागी शिरपेंच शोभे ॥ १॥



केली चैतालीने गीताची सुर्वात । मंजूळ स्वरांची होई लयलूट ॥

किती गोड सांगू काय त्यांचे सूर । बाळा-अनुराधा गायलॅ मधूर ॥ २ ॥



संगीताने केली शब्दाची संगत । शब्दांची गं गोडी वाढवी संगीत

ढोलके बांसरी सुंदर साथ । शिर्षक गीतात सगळ्यांचा हात ॥ ३ ॥



सगळ्यांची आता वेशी वर धाव । ' कवितांचे गाव ' वाढला गं भाव ॥

कवितांचे गाव कर्णोपकर्णी गं । जनात मनात भरली गं शीग ॥ ४ ॥



सुरेश पेठे
१८ सप्टेंबर २००८

दोन ढग !

कथा ह्या वर्षीच्या, वर्षा ऋतु तली । सांगतो कथा ऐका लक्ष देऊनी ॥

नभी ढग दोन मदमस्त हत्ती । राखून ते होते आपुलीच मस्ती ॥

आपुल्या जगात ते मस्तीत होते । विहरत विहरत जात होते ॥

म्हणे एक त्यात मीच आहे मोठा । दुसरा कबूल नाही, मी का छोटा ? ॥

होते अजून ढग विखुरलेले । सगळेच तयांना विसरलेले ॥

जवळची दोघे अकस्मात आले । व्हावयाचे तेच आकाशी घडले ॥

सगळे कडून काजळून आले । दिसेना कोण आहेत आपुले ॥

घर्षण होताच आवाज जाहला । कडकडाट , लखलखाट झाला ॥

तांडव नृत्य अन थयथयाट । पृथ्वी वर हाहा:कार घबराट ॥

सपाटून वृष्टी, सगळेच कष्टी । न्हाऊनच निघाली संपूर्ण सॄष्टी ॥

दृष्टी पुढे सर्व अंधारून आले । नभीचे जलकुंभ रिते जहाले ॥

कोणी म्हणाले वादळ रे शमले । कालांतराने नभ निरभ्र झाले ॥

जल रूपे अवतरले ग धरित्री । झरझर सरिता वाहू लागली ॥

अन

मिळाला त्यातच एक अभियंता । मानितसे सर्वथा मनी महत्ता ॥

घालूनि बांध अडविला प्रवाह । दुभंगून गेला सगळा प्रवाह ॥

जनात त्याची होय वाह वाह ॥ हळहळले कोणी कथीले हाय ॥

दुसरी दिशा मिळाली प्रवाहाला । वेगळाले लागले वहावयाला ॥

कौतुक करी कोणी नव्या दिशांचे । पाप ते होतेच ना ताटातूटीचे ॥

वाहते जल हे उतारा कडेच । पारित वळणे उडया घेउनच ॥

किती अडथळे असुंदे तयांला । माहीत आहेच समस्त जलाला ॥

पुढे वाट एकच आहे तयांची । कालांतराने भेट होईल त्यांची ॥

विसावा पुढे नजीक घ्यावयाचा । संगम अटळ तळ रे सागराचा ॥

मार्ग अनेक पोहोचण्या साठी । मुक्काम एकच पायी जगजेठी ॥

सुरेश पेठे
१७ सप्टेंबर २००८

आरती " कवितांचे गावाची "

आज सकाळी सकाळी कोठुनसा गजर कानी आला आणि आरतीचे स्वर कानी पडू लागले. हळूं हळूं स्वर स्पष्ट होउ लागले.तेव्हाच मनाचा पटलासमोर दृष्ये दिसू लागली. ' कवितांचा ' गाव स्पष्ट दिसू लागला. ते देवाचेच रूप होते. काय ती कांती अन काय ते तेज ! माझे तर डोळेच दिपले, आणि जेव्हा मी डोळे उघडले.... अहा हा हा .. त्या दर्शनाचा सोहळा म्या काय वर्णावा ........

मी ही आरती गाऊ लागलेलो होतो....................................





जय जय देवा कवितांच्या गावा , येथे येवोनि हरली भय चिंता

जय जय देवा कवितांच्या गावा , जय जय देवा कवितांच्या गावा ॥ धृ ॥

झळाळून आले कवितांचे गाव , डोळे दिपुनि गेले पहाता ध्यान

अवचीत ठाकले रूप सामोरी , भव्य दिव्य रूप आहे मनोहारी

सगुण निरगुण नकळे मजला , त्रिभुवना मध्ये आगळि किमया ॥ १ ॥

तुझ्या कडे येतांना तोडले पाश , तुझ्या मुळे झाले मोकळे आकाश

तहान भुकेचे झाले विस्मरण , आम्हा सर्वां भेटी आले परब्रह्म

वाटे झाले मम देहाचे सार्थक , मनी आता नको गोष्टी निरर्थक

भक्तांना लागे तुझा लळा वेल्हाळा , आहे गावा मध्ये कविंच्या माळा ! ॥ २ ॥

इथे येण्यासाठी कोणा न मज्जाव , कोणा नको विनवणी वा आर्जव

इथे नाही आषाढी अन कार्तिकी , बाराही महीने भक्त जन येती

भक्तांची कवने तुजसी वर्णिती , मी काय सांगावी नामाची महती

तुझ्यावर आम्ही ठेवली रे आशा , करणार नाही आमची निराशा ॥ ३ ॥

सुरेश पेठे
१३ सप्टेंबर २००८

इतिहास

आजचे वर्तमान हा उद्याचा इतिहास
आत्ताच मांडा,होईल नाही तर विपर्यास !

इतिहास नेहेमी शोधून जमा करावा लागतो
जमा झालेलाच तर इतिहास असतो

इतिहास नुसताच घडलेले सांगत नाही
तर,न सांगीतलेलेच त्यात असते काही !

इतिहास शोधणारा हवा तितकाच निष्णात
नाही तर सारेच की हो जाईल मसणात

इतिहासाचे अर्धवट ज्ञान म्हण्जेच अज्ञान
सज्ञानाने उलगडेल कोड्यांचे विज्ञान

इतिहासाला असतात दोन बाजूं जरी
चांगले काय न वाईट ज्यांचे त्यांवरी !

इतिहासाचा लावावा ज्याचा त्याने अर्थ
होण्यास वेळ लागणार नाही अनर्थ

इतिहासाचा अभ्यास तौलनिक हवा
सांपडेल त्यातूनच अमौलीक ठेवा !!

सुरेश पेठे
११ सप्टेंबर २००८

मराठी अस्मिता

तसा अमिताभ माझा कोणीच लागत नाही....
खरंच कोणीच लागत नाही....

पण सगळे म्हणतात तोच खरा
पण कोण कुठले?का सहन करावा नखरा?

मराठी माणसाने अस्मिताच विकली
नको त्या गोष्टींना मराठी भाळली

शिवाजी नंतर विझला स्वयंप्रकाश
नको ते ते जवळ केले आम्ही पाश

स्वत:चा अपमान, आम्हा सहन न होई
मराठीला आम्ही आपले मानतंच नाही

कोणीही यावे टपली मारूनि जावे
आमचेच चुकले! थोबाडीत मारुन घ्यावे

का केला होता आम्ही अट्टाहास
फुके मारिले ना 'हुतात्मे 'एकशेपाच

भाषावार प्रांत सगळ्यांनी भांडून घेतले
पण आपला तो आपला, दुसरे प्रान्त ही आपले !

बाकीचे चाखती , अन गाती भाषेची महती
आमचे ओरडणे तेव्हढे, फिरली आमची मती

खरं तर आम्ही बाळ, राज ना का आणा ?
जर आम्हीच जपला आपुला मराठी बाणा!

सुरेश पेठे
११ सप्टेंबर २००८

हवी एक शाळा

कवितेच्या गांवी हवी एक शाळा

आम्हाला नं तिचा येई कंटाळा ॥


नेमा मावशीला मुख्याध्यापिका

हाती छडी मात्र देऊं च नका ॥


कवितेच्या गावी शाळा नावाजावी

दादा काका ताई इथे समजावी ॥


आम्ही इथे सारे आहो विद्यार्थी

बघा कुठे आहे आमची गती ? ॥


शिकवा आम्हाला ते रूपक यमक

स्वामीजी सांगा आम्हाला गमक ॥


र्‍ह्स्व दीर्घांची करू उजळणी

अनुप्रासांची होवूं द्या मांडणी ॥


कधी तरी हवी सुट्टी शाळेला

मला मात्र नेमा घंटा बडवायला! ॥


सुरेश पेठे
१० सप्टेंबर २००८