Friday, April 27, 2018

आसक्ती


आता आपण राहिलो,भोजन भाऊ फक्त ।
भोजन संपले की, उरलो,फक्त विरक्त ॥१

नात्यांची वीण अशीच, जाई उसवत उसवत ।
पुढे काय वाढीले, विचार नाही करवत ॥२

दिवस गेले, गेली वर्षे, काळ जातो वाहवत ।
काळाचाच हा महिमा, कां न, आम्ही वोळखत ॥३

दुनियाची रीत आहे, करा कितीही शिकस्त ।
काय तुझे राहिले आता, का राहतो आसक्त ॥४
सुरेश पेठे
सकाळी ७ वाजता
२८ एप्रील २०१८