बधीरता अंगी आली
नकळे कळून सारे
जाणीव मरून गेली
आकलनाच्या पल्याड
उघडेच ना कवाड
निसटून गेले सारे
अवचित हे घडले
कोणास काय विचारू ?
घरटी कुठे पांखरू
काय पाहू काय सांगू
आघात कसा विसरू
मन नाही थार्यावर
काय काय गवसले
होते ते ते हरवले
ठावुक मजसी नाही
मनाची अशी अवस्था
इथे सारी अस्वस्थता
ही तर त्याची व्यवस्था
हाच इथला शिरस्ता
मेघांनी नभ भरले
चमकत भिवविले
स्वच्छ अगदि दिसेना
मळभ दूर सरेना !!
सुरेश पेठे
०२ डिसेंबर २००८
No comments:
Post a Comment