तूं तुझ्या अन माझ्यात, कां अशी रेघ आखली
संपले अद्वैत अपुले, कां उगाच वाटले
अनंत योजने दूर, मजसी इथे लोटले
वाढता वाढत आहे, ही आपल्यातली दरी
हीच एक भिती मज, काळीज जाळे अंतरी
होय भास नित्यनवा, जवळी माझ्या तूं उभा
भासच तो छळतो गं, दिपवीत दिव्य प्रभा
काय एकेकाची तर्हा, आनंद होय का तुवा ?
जीव जाय विरहाने, भेट नाही जीवा शिवा !
सुरेश पेठे
०३ डिसेंबर २००८
No comments:
Post a Comment