सांगतात तूं कुसुमाची ॥
वर्षा समयी चींब भिजलेली
नव्हे ना तूं जलराणी ॥
उडवित फडकावित पदर
होतेस गायब वायूसंगे ॥
जळि,स्थळि काष्टी, पाषाणी
वाटत राही तूं त्यांच्यावाणी ॥
प्रभात काळी पडती गाली
सांगती किरणे तूं सोन्याची ॥
पौर्णिमेची ती किरणे देती
ग्वाही तूं तर चांदीची
गाल चाविता सखे तु झे मी
सांगती ग तूं लोण्याची
मऊ लोण्याहून कांचन अंग
कशाची ग तूं बनलीस सांग ?
सुरेश पेठे
०७ सप्टेंबर २००८
No comments:
Post a Comment