मी ही आरती गाऊ लागलेलो होतो....................................
जय जय देवा कवितांच्या गावा , येथे येवोनि हरली भय चिंता
जय जय देवा कवितांच्या गावा , जय जय देवा कवितांच्या गावा ॥ धृ ॥
झळाळून आले कवितांचे गाव , डोळे दिपुनि गेले पहाता ध्यान
अवचीत ठाकले रूप सामोरी , भव्य दिव्य रूप आहे मनोहारी
सगुण निरगुण नकळे मजला , त्रिभुवना मध्ये आगळि किमया ॥ १ ॥
तुझ्या कडे येतांना तोडले पाश , तुझ्या मुळे झाले मोकळे आकाश
तहान भुकेचे झाले विस्मरण , आम्हा सर्वां भेटी आले परब्रह्म
वाटे झाले मम देहाचे सार्थक , मनी आता नको गोष्टी निरर्थक
भक्तांना लागे तुझा लळा वेल्हाळा , आहे गावा मध्ये कविंच्या माळा ! ॥ २ ॥
इथे येण्यासाठी कोणा न मज्जाव , कोणा नको विनवणी वा आर्जव
इथे नाही आषाढी अन कार्तिकी , बाराही महीने भक्त जन येती
भक्तांची कवने तुजसी वर्णिती , मी काय सांगावी नामाची महती
तुझ्यावर आम्ही ठेवली रे आशा , करणार नाही आमची निराशा ॥ ३ ॥
सुरेश पेठे
१३ सप्टेंबर २००८
No comments:
Post a Comment