ओळीखले ?नव्हते, बालीश तूं तरीही
आलो नजीक तेव्हा गेलीस तूं तरीहि
.
जाशील तूं कधीही, चिंतेत रात गेली
ना एकरूप झालो, होतीस तूं तरीही
.
सांगून जावयाचे होतेस तूं मलाही
काहीच का नसे म्हणालीस तूं तरीही
.
आळीव राग मी रे ऐकावयास येतो
ऐकू न ये असे ? गाईलीस तूं तरीही
.
माझ्या मनात राही कांटा सले मलाही
चालेलना मनी राहीलीस तूं तरीही
.
सुरेश पेठे
८जून०९
[ ह्यातील दुसरा शेर श्री अरविंदजीं नी दिलेला आहे. त्याला गुंफून ही गझल लिहीली आहे. ]
Monday, June 8, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
3 comments:
अतिशय सुंदर गझल आहे. मला खूप आवडली. सप्रेम नमस्कार! - अजिंक्य नवरे
Khupch chhan kaka! mala khup awadali.
@ संपदा,
खरं तर गझल हा माझ्या साठी नवा प्रकार आहे. मध्यंतरी एक गझल कार्यशाळेत मी गेलॊ होतॊ ( माझ्या ऑर्कुट अल्बम मध्ये फोटॊ आहेत ). तेव्हा हा हाताळला खरा , पण अजून तितकासा पचनी पडला नाही !
Post a Comment