(मी आणि माझे सहकारी असे आठ जण बालगंधर्व कलादालन , पुणे येथे आज, २६ मार्च २००९ , गुरूवार रोजी संध्याकाळी ५ वाजून ३० मिनीटाने आमच्या चित्रांच्या प्रदर्शनाचे उदघाटन प्रसिध्द चित्रकार व संस्कारभारतीचे राष्ट्रीय मंत्री श्रीयुत रवि देव ह्यांच्या शुभहस्ते करीत आहोत.
तेथे मी माझ्या चित्रांना मांडतोय, तस्सेच हे मनोगत ही तुम्हा पुढे मांडतोय ! )
माझ्या प्रदर्शना निमीत्त मनोगत
माझ्या मनी मनोगत, तुम्हा पुढे मांडतोय
दिन उगवला आज, तेच तुम्हा सांगतोय
सप्तरंगांची चाहूल , होती मनी बालपणी
मिळे त्यास अपसूक , माती आणि खतपाणी
पण कधी वाळवंट , कधी दिसे मृगजळ
कधी हाती करवंटी. कधी भरेना ओंजळ
दिन गेले वर्षे गेली, कुठलं फुलपांखरू ?
सुरवंट तस्सा राही , पाहू सारेच विसरू
पण नाही न्याय आहे,’ देवा’ पाशी वाव आहे !
’संस्कारभारती’ ची साथ , सदाचि पाठी आहे !
मज आता ना फिकीर, अर्धे आयु उलटले
पुर्वीचे दिन सगळे , आता सारे पालटले
आता जगतो मस्तीत , रोज रोज काढी चित्र
भेटीला या जीवा शिवा , प्रदर्शना आले मित्र,
हीच सारी करामत , मांडीली माझी तपस्या
आशिर्वाद द्या शुभेच्छा , असुद्या की अमावस्या
माझ्या मनी मनोगत, तुम्हा पुढे मांडतोय
दिन उगवला आज, तेच तुम्हा सांगतोय
सुरेश पेठे
२६मार्च०९
Wednesday, March 25, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
2 comments:
khup ch chhan!
ह्या आमच्या चित्र प्रदर्शनाला २६ मार्च ला एक वर्ष होईल. त्याबाबत एक पोस्ट तेव्हा टाकणार आहे. अभिप्राया मुळे छान वाटले.
Post a Comment