बरसत राही घन
आठवांना फुटे पानं
अचंबित झाले मन
पण घेतलीय आण ॥
काय पाहू काय ऐकू
टवकारले गं कान
काहूर आठवणींचा
नाही उरले गं भान ॥
चिंब चिंब चोहिकडे
भिजले सारे आंगण
मज पडले साकडे
नाही साहवे हा ताण ॥
झड झड संपेचना
कसे आवरू रे मन ?
कुठे थांबलासी कान्हा
अंगी उरला ना त्राण ॥
सुरेश पेठे
१६ जून २०११
Thursday, June 16, 2011
Subscribe to:
Posts (Atom)