अठ्ठावीस युगे उभा विटेवरी
कंटाळलास, कटी घेउनि करी ?
म्हणे वाट पाहसी पुंडलीकाची
गेल्या कित्येक वार्या, ना तू सावरी
भक्तांला ओढ तुझी, तुला ही त्यांची
करेल तुलना, कोणी बरोबरी ?
चवकशी ती केली असशीलच
का अडला पुंडलीक आजवरी ?
पुंडलिका सारखे अनेक भक्त गण
येती भेटाया होऊन वारकरी
पाऊस पाण्याची यंदा नाही बेगमी
तरी ठेविला हवाला तुजवरी
काय चुकले बा सांग तू विठ्ठला
काय करावे, आम्हास सांग तरी !
सुरेश पेठे
आषाढी एकादशी,(२०१२) शके १९३४